महाराष्ट्रात कलम १४४ अर्थात जमावबंदी लागू

नाईलाजास्तव मुख्यमंत्र्यांचा निर्णय


मुंबई : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण राज्यात कलम १४४ अर्थात जमावबंधी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे याबाबत माहिती दिली. उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून ऐतिहासिक आणि मोठे निर्णय घेतले जात आहेत. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव झालेल्यांची संख्या वाढते आहे. ही संख्या कमीत कमी किंबहुना थांबवायची आहे आणि म्हणून उद्या सकाळपासून मुंबई, पिंपरी-चिंचवड आणि नागपूरच नहे तर महाराष्ट्रातल्या संपूर्ण नागरीभागामध्ये १४४ कलम नाईलाजाने लावत आहे", असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. ___"उद्यापासून नागरी भागात जमावबंदी लागू. जीवनावश्यक वस्तू चालू राहतील. वीज पुरवठा, बँका आणि त्यासंबंधी व्यवहार चालू राहतील. पण जिथे वर्क फ्रॉम होम शक्य तिर्थ करा", असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. “उद्यापासून पुढचे काही दिवस अधिक दक्षतेनेपार पाडायचे आहेत. सातत्याने मी आपत्याला सांगत आहे, आपण आता संवेदनशील टण्यात पाऊल टाकलेलं आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. “सरकारी कर्मचारी संख्या २५ वरुन ५ टक्क्यांवर आणली आहे. केवळ ५ टक्के सरकारी कर्मचारी राज्याचा भार सांभाळणार आहे. त्यांच्यावर जास्त भार देऊ नका. है संकट टाळण्यासाठी सर्वांनी खबरदारी घ्या. जीवनावश्यक कामांसाठीच बससेवा चालू राहील. मंदिर, मशिदी चालू असतील तर ती तातडीने बंद करा, असं उद्धव ठाकरे म्हणाले.